माझ्याकडे प्रश्न आहेत सध्या आणि उत्तर सुद्धा काही.
पण सगळीच तेरड्य़ाचि फुलं, रंग, कधी सुगंध नाही
मग परत एकदा सुरू अथक, अहनिहर्श मंथन मनी
मी मेरू मन्दार आणि माझ्याच वासनांचा वासुकी
कोणते देव आहेत मनात, आणि लपलेले दानव कोण
अमृत काय आणि काय विष, पहिला घोट घेणार कोण
मिळतिल उत्तर सगळी , संपतील प्रश्न सारे
शान्ततिल मनातल्या मनात, सोसाटयाचे वारे
पण प्रत्येक उत्तर एक नवीन प्रश्न घेउन येतं
आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच असं नसतं!



छान जमली आहे कविता. प्रत्येकाची घुसमट होतच असते. त्यातल्या त्यात सुखावह हेच की कवीला हे व्यक्त करता येतं. छान.
जो अंबरी उफळता खुर लागलाहे तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर